श्रीस्वामी समर्थ -जीवन प्रवास /त्यांच्या जीवनाबद्दल माहीती


श्री स्वामी समर्थ -जीवन प्रवास /त्यांच्या जीवनाबद्दल माहीती




श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी माहिती 

“हम गया नहीं, जिंदा हैं’’......

श्री स्वामी समर्थ महाराज :- आज चैत्र कृष्ण पक्ष त्रयोदशी महाराजांची पुण्यतिथी आहे 

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ (प्रकटकाल : इ.स.१८५६-१८७८)

माघ वद्य १, शके १३८०, इ.स. १४५८ मध्ये श्रीनृसिंहसरस्वती स्वामी  श्रीशैल्य यात्रेच्या निमित्तानेकर्दली वनात गुप्त झाले.याच वनात तीनशे वर्षे ते प्रगाढ समाधीअवस्थेत होते. याकाळात त्यांच्या दिव्य शरीरा भोवतीमुंग्यांनी प्रचंडवारूळनिर्माण केले. याजंगलात एका लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारूळावर चुकून बसला व श्री स्वामी वारुळातून बाहेर आले. तेथून ते प्रथम काशीस प्रगट झाले. पुढे कलकत्ता येथे जाऊन त्यांनी कालीमातेचे दर्शन घेतले. नंतर गंगातटाकाने अनेक ठिकाणी भ्रमंती करून गोदावरी तटाकी आले. तेथून हैद्राबादवरून मंगळवेढ्यास बारा वर्षे राहिले.आणि मग पंढरपूर, मोहोळ, सोलापूरमार्गेअक्कलकोट येथे आले. त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्यअखेरपर्यंतम्हणजे शके १८०० पर्यंत होते.

दत्त संप्रदायातश्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतारम्हणून समजले जात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत. म्हणजे दत्तावतार होय.

अक्कलकोटचे परब्रह्मश्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, ''भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.'' आजही त्याचीप्रचीती भक्तांना येत असते.श्री स्वामी समर्थ अक्कलकोटलाप्रथम खंडोबाच्या मंदिरातइ.स. १८५६ मधेप्रकट झाले. त्यांनी अनेक चमत्कार केले. जनजागृतीचेकार्य केले. ''जे माझे अनन्य भावाने असेचिंतन, मनन करतील, त्याअनन्यभावाच्या चिंतनाची उपासना, सेवा मला सारसर्वस्वसमजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन,'' असे त्यांनी आश्वासन भक्तांना दिले.

स्वामी समर्थ क्षणात अंतर्धान पावत व अचानक प्रगट होत. स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात आंबेजोगाईयेथे प्रगट झाले. हरिद्वारहूनकाठेवाडातील जिविक क्षेत्रातीलनारायणसरोवराच्या मध्यभागीसहजासन घालून बसलेले दिसले. नंतर पंढरपुरातीलभीमा नदीच्या भर पुरातूनचालत जाताना भक्तांनी पहिले.

अशाप्रकारे स्वामींनीमंगळवेढेयेथीलबसप्पाचे दारिद्र्यनष्ट केले. त्याला सापाचे सुवर्ण करून दिले. त्या गावातील बाबाजी भट नावाच्या ब्राह्मण गृहस्थाच्या कोरड्या आडातपाणी आणले. पंडित नावाच्या आंधळ्या ब्राह्मणास डोळे दिले. हे सर्वचमत्कार स्वामी समर्थांनी लोकांनाभक्तिमार्गाला लावण्यासाठी केले.संत हेलोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्याधारणेसाठीआणि लोकांच्या आत्मिक, पारमार्थिक ऐश्वर्यासाठीच असतातते दुसर्यांनासुखानेसुखावणारे असतात.

स्वामी समर्थांनी समाजातीलदुष्ट प्रवृत्तीनाहीशी करून तेथे सतविचारांची पुनर्स्थापना केली. दुःखी, पिडीतलोकांवर कृपेचा वर्षाव केला.इच्छुकभक्तांनास्मरणात राहील असाअनुभव देऊन प्रेमबंधनाने आपलेसे केले. स्वामी समर्थांना श्रीमंत वगरीबसारखेच मानीत. त्यांनासाधा भोळा भक्तीभाव आवडत असे. त्यांच्या अंतरी जनसामान्यांविषयी अपार प्रेम होते.स्वामी समर्थअतिशयतेजःपुंजहोते. कोटी सूर्याचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे. डोळ्यातअपरंपार कारुण्य होते. भक्तांवर संकट कोसळले तरते दूर करीत.

एकदा स्वामी समर्थांच्यादर्शनासाठी अक्कलकोटचे महाराज मालोजीराजेहत्तीवर बसून आलेहोते. जेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवले, तेव्हा त्यांनी मालोजीराजे यांच्या श्रीमुखातदिली वम्हणाले,''तुझे मोठेपण तुझ्याघरात. ते येथे कशाला पाहिजे?आम्ही असे राजे पुष्कळ बनवतो.'' तेव्हापासून मालोजी राजेस्वामी समर्थांच्या दर्शनाला पायीच येत असत.

अक्कलकोट संस्थानातील मानकरी सरदार तात्या भोसले यांचे मन संस्थानातून, संसारातून विटले, तेव्हा ते स्वामी समर्थांच्या चरणी राहून त्यांची भक्तिभावे सेवा करू लागले. एकदा ते स्वामी समर्थांजवळ बसले असता ते तात्या भोसले यांना म्हणाले, ''तुझ्या नावाची चिट्ठी आली आहे.'' तेव्हा तात्या भोसले यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली की, ''मला अजून आपली सेवा करावयाची आहे!'' तात्या भोसले यांनी त्यायमदूतालापाहिले, ते घाबरले. आपल्या भक्ताची तळमळ पाहून स्वामी समर्थांनी यमदूताला सांगितले की, ''हा माझा भक्त आहे. याला स्पर्श करू नकोस. त्या पलीकडच्या बैलाला घेऊनजा!'' त्या बैलाचे प्राण गेले व तो जमिनीवर कोसळला.

श्री स्वामीसमर्थ हे भक्तकाम कल्पद्रुमआहेत,भक्तकामकामधेनु आहेत, चिंतामणी आहेत. त्यांच्याहृदयात करुणेचा सागर हेलावतो आहे. त्यांनाहाक मारा,ते सदैव तुमच्या जवळच आहेत. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या कल्याणाबाबतसदोदित जागरूकराहून त्यांची भयानकसंकटातूनमुक्तता करतात.

अक्कलकोटलामोरोबाकुलकर्णी नावाचा एक स्वामीभक्त होता.त्याच्या अंगणात श्री स्वामी समर्थ आपल्या सेवेकर्यांसह झोपले होते. मोरोबाच्या पत्नीस रात्री पोटदुखीचा त्रास होऊलागला.हा त्रास तिलाअसह्य झाला. तीतशीच विहिरीतजीव द्यायला निघाली.स्वामी समर्थ एकदम जागे झाले व सेवेकर्यांस म्हणाले, ''अरे, विहिरीवरकोण जीवदेतेय पहा बर.त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन ये !''सेवेकरीविहिरीजवळ गेलातो मोरोबाची पत्नी विहिरीत उडी मारण्याच्यातयारीत दिसली.त्याने तिलास्वामी समर्थांपुढे आणले. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिची पोटदुखीनाहिशी झाली.

स्वामी समर्थांनीआपल्या रूपाने आणिमग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रुपात दर्शन घडविल्याचे अनेककथांतूनआढळते. द्वारकापुरीत त्या वेळी सूरदासनावाचे महानकृष्णभक्तराहात होते. हे सूरदास जन्मांधहोते. आपणास सगुण साकार असेश्रीकृष्ण दर्शन व्हावे अशीत्यांची फार इच्छा होती. स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले. त्यांनी सूरदासालाहाक मारली. म्हणाले, ''तू ज्याच्या नावाने हाका मारीत आहेस तो मी, बघ इथ तुझ्या दारात येऊन उभा आहे. सूरदास, पहा जरा.''इतक बोलूनसमर्थांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना हस्तस्पर्श केला. त्याबरोबर सूरदासाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली. आणि त्यांना शंख, चक्र, गदाधारीअसे श्रीकृष्णाचे सगुणरूप दिसू लागले. सूरदास सद्गदित झाले. थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांना स्वामी समर्थांनी आपले वास्तव रूपाचे दर्शन घडविले. सूरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले, ''मला दिव्यदृष्टीदिलीत. आता मला जन्ममरणाच्या या तापापासूनमुक्त करा!''स्वामी समर्थांनी सूरदासाला ''तू ब्रह्मज्ञानीहोशील!''असा आशीर्वाद दिला.

स्वामी समर्थांचे अगणित भक्तजागोजागी आहेत. १८७८ सालीस्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग केलाअसला तरी ''हम गयानही, जिंदाहै l '' हे त्यांचे वचन भक्तांना आधार आहे. ज्या ज्यावेळीत्यांचे स्मरण केलेजाते, त्या त्या वेळी श्री स्वामी समर्थ आपणापाशीच असतात, हे निश्चित.

       ||श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
             ||श्रीगुरूदेव दत्त ||

Comments

Popular posts from this blog

स्वामी चरित्र अवतणिका. Swami Charitra Avatarnika .The Spiritual Indians

श्रीमद्भागवत गीता का 15वा अध्यय - संस्कृत में | Shreemad Bhagvad Geeta 15 Adhyay - Sanskrit. The Spiritual Indians

श्रीमद्भागवत गीता का १२वा अध्याय - संस्कृत में | Shreemad Bhagvad Geeta 12 Adhyay | The Spiritual Indians